बाणेर येथे झालेल्या भीषण अपघातात काल (ता १७) एका चिमुरडीचा (वय वर्ष ४) आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. सोबत असणारेही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर विसाव्या मिनिटाला चतुःश्रींगी पोलीस स्टेशन येथे चार वकील अपघात ज्या महिले मुळे झाला तिच्या बचावासाठी हजार झाले होते. पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर "श्रॉफ बिल्डर्स' यांची पत्नी हि कार चालवत होती. अपघात होऊन चोवीस तसहि झाले नाहीत तरी या महिलेला बेल सुद्धा मिळाली आहे.
आता हा खटला कोर्टात उभा राहील. बचाव पक्ष अनेक मुद्दे उपस्थित करेल. - रस्त्यावरचा चुकीचा डिव्हायडर हि कशी प्रशासनाची चूक आहे- रस्त्यावरच अचानक येणार वळण या मुळे कुठल्याही चालकाचे नियंत्रण जाऊ शकते असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातील. मान्य आहे महिलेच इंटेंशन हो कोणाला मारण्याचे नव्हते अरे पण ज्यांनी चूक केलीये त्याला त्याची जाणीव होईल असा काहीतरी होऊ द्या. असाच खटला अनेक वर्षे चालतो.
ज्या हॉस्पिटल मध्ये या सगळ्यांना नेला त्या हॉस्पिटल ने तर आत्तापर्यंत ८ लाखाचे बिल सुद्धा लावले आहे. या उप्पर म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमान पत्राने तर या माहिलेचे नावं सुद्धा बातमी मध्ये दिलेले नाही. ज्यांनी अपघात बघितला, जे या मध्ये वारले, जखमी झाले त्या सगळ्यांची नवा आहेत पण जिच्यामुळे हा अपघात घडला तिचा साध नाव सुद्धा बातमी मध्ये लिहू नये - का तर कुठल्या तरी अतिश्रीमंत माणसाची हि पत्नी आहे (मान्य आहे तिचा इंटेंशन नव्हत .. अरे तरी काही तरी लाज बाळगा). अशा अपघातातून जनतेने, प्रशासनाने, पोलिसांनी आणि आरोपींनी जे शिकायला हव ते राहिला बाजूला आणि सगळे जण या अपघाताचा बाजार करायला तयार झाले आहेत. हे असा पुन्हा पुन्हा का ? एक सलमान खान चा अपघात आणि त्यावरचा खटला आपल्याला शिकायला पुरेसा नाही का ? काल त्या डिव्हायडर वर ती आई आणि तिची चिमुरडी होती उद्या त्या डिव्हायडर वर तुम्ही हि असू शकता .
No comments:
Post a Comment